Monday 1 February 2016

मृत्यु काय फक्त पार्थीवच असतो?

मृत्यु काय फक्त पार्थीवच असतो?
जगण्याच्या चक्रात फिरताना
कितिदा भोवळ येते
ती फक्त देहाला नाही..

कित्येक अपेक्षाभंग
अपमान
पराभव
आपल्याच नजरेतून उतरावं लागणं
निराशा...
दुःख.. हतबलता..
ही सगळी मृत्युचीच रूपं..

पार्थिवाच्या कुशितले
असे मानसिक आणि
आध्यात्मिक मृत्यु अनुभवता येतात
आणि त्यांच्या पाठोपाठ
लाभतात नवे जन्म नवी ओळख देणारे..

उन्नत करणारे असतात
हे मृत्यु..जन्माचे फेरे..! 
नश्वर देहाच्या सोबतीनंच
अनुभवता येतात ते..!

***

No comments:

Post a Comment