उगवताच सूर्याला अवचित
पूर्ण ग्रहण लागले
बघता बघता आडोशातुन
तेज मोकळे झाले
निमिषभराचे ग्रहण झेलुनी
पक्षी उडून गेले
तिमिराचे ते मृगजळ होते
वृक्षांनाही कळले
कुणीहि येवो आड कसेही
तेज कधी ना लपते
दृष्टी आपली अवसेच्याही
पल्याड ना पाहते
तळपत असते अखंड निर्मम
सूर्यबिंब आकाशी
उदयास्ताचा खेळ चालतो
मनातल्या क्षितिजाशी.!
***
No comments:
Post a Comment